Saturday, 24 March 2018

संदिप वसंत पवार ...... आपले पर्यटन सोबती




संदिप  वसंत पवार ...... आपले पर्यटन सोबती 


         अनेक लोकांचे स्वप्न असतात की संपूर्ण जगात भटकंती करावी . हे स्वप्न सत्यात उतरवणारे संदिप  गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने आपले काम ''हॅलो प्रवासी'' या संस्थेमार्फत निष्ठेने करीत आहेत. 

        कल्याण पूर्वेतील शिशुविहार या शाळेत संदिपचे  प्राथमिक  शिक्षण झाले. ते लहानपणापासूनच शांत स्वभावाचे व अभ्यासात चुणचुणीत होते. पुढे त्यांनी कल्याण पश्चिममधील 'न्यू हायस्कूल' या शाळेमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांच्या आई पोस्टात कामाला होत्या. जर कधी त्यांच्या आईला घरी यायला उशीर झाला तर संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी संदिपवर असायची . तेव्हा ते जेवणात त्यांच्या आवडीची चपाती आणि बटाटा भाजी बनवायचे. 

       लहान भाऊ विलास आणि लाडकी बहीण शिल्पा यांच्या आनंदी सहवासात संदिपचे बालपण संपले. त्यांच्या आई लिलावती यांनी नोकरी करून  मुलांना छान सांभाळले. नोकरी करत असल्या तरी मुलांवर चांगले संस्कार करण्यात त्या कधीच मागे पडल्या नाहीत. त्याचा प्रत्यय संदिपच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यावर येतो. संदिपचे अतिशय सकारात्मक असे व्यक्तिमत्व आहे. माध्यमिक शालांत शिक्षणासाठी पुढे ते उल्हासनगरमधील आर. के. तलरेजा  महाविद्यालयातून  बी. कॉम. पदवीधर म्हणून बाहेर पडले आणि  पुढे त्यांनी अर्थाजनासाठी काम सुरु केले. 

         मुंबईला चार्टर्स अकाउंट कंपनीत त्यांनी पहिली नोकरी केली. नंतर वर्षभरामध्ये अकाउंटचा अनुभव घेऊन अकाउंटन्ट म्हणून काम सुरु ठेवले. पुढे तीन वर्ष 'ओमकार डेव्हलोपर्स, बदलापूर' येथे कंपनीचा हिशोब जबाबदारीने सांभाळला. त्यानंतरचा प्रवास परत मुंबईच्या दिशेने सुरु केला आणि आदित्य बिर्ला समूहाच्या दिग्विजय इंटरनॅशनल या कंपनीत काम सुरु झाले. त्यांनी सिरियन एरलाईन्स या कंपनीत ६ वर्ष मुख्य अकाउंटन्ट म्हणून काम केले. पुढे थॉमस कुक या कंपनीत ३ वर्षे 'वरिष्ठ लेखापाल'  म्हणून काम करीत असतांना त्यांना परदेशात स्थायिक व्हायची संधी आली. परंतु त्यांनी ती नाकारली व सचिन ट्रॅव्हल्समध्ये पुढील सेवेसाठी ते रुजू झाले. 

          सुनील वागळे यांच्यासोबत २०१३ मध्ये संदिपने कल्याण येथे ''हॅलो प्रवासी'' या नावाने पर्यटन क्षेत्रात कार्य सुरु केले. आज ''हॅलो प्रवासी''  यांच्या कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि पुणे येथे शाखा सुरु आहेत. जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज ''हॅलो प्रवासी''  २०१३ पासून कार्यरत आहेत. 

         १३ जुलै २०१३ मध्ये सुरु झालेले  ''हॅलो प्रवासी'' यांचे काम पहिली सहल आयोजित करून सर्व पर्यटकांना २४ ऑक्टोबरला राजस्थान, केरळ, काश्मीरला जवळ जवळ ३०० कुटुंबीयांना घेऊन गेले. त्यानंतर भारत भ्रमंतीचा यशस्वी टप्पा दोन वर्षात पूर्ण केल्यावर ऑक्टोबर २०१५  मध्ये थायलंड, मलेशिया, सिंगापूर अशी पहिली आंतरराष्ट्रीय टूर यशस्वी झाली. 

           आज ''हॅलो प्रवासी'' आपला पर्यटनसोबती बनून पर्यटकांना सेवा देत आहेत. त्यांचे रहस्य म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असे ग्राहकांना व पर्यटकांना १०० टक्के समाधान मिळेल असे काम करणे. कोणतीही सहल जाण्याअगोदर संदिप हे त्या ठिकाणाचा अभ्यास करतात. त्यानंतर सहलीचा कार्यक्रम तयार करतात. अशाप्रकारे हसतमुख व्यक्तिमत्व व जबाबदार व्यक्ती हे  गुण संदिपमध्ये दिसतात. संदिपला त्यांच्या व्यवसायात सुनील वागळे यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची जोड लाभली आणि संदिपने त्यांच्या साथीने २०१५ मध्ये डोंबिवली, २०१६ मध्ये ठाणे व २०१७ मध्ये पुणे येथे  ''हॅलो प्रवासी'' या शाखांचा विकास केला. अशा पद्धतीने दरवर्षी एक एक शाखा स्थापन करण्याचा ''हॅलो प्रवासी'' यांचा मानस आहे. 

           अशाप्रकारे  संपूर्ण जग प्रवास करण्यासाठी खात्रीशीरपणे पर्टनसोबती म्हणजे ''हॅलो प्रवासी''