गणेश तानाजी जगताप
खेळाला न्याय देणारा... राष्ट्रीय खेळाडू.
गणेश यांचे प्राथमिक शिक्षण गणेश विद्या मंदिर शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ज्ञान मंदिर शाळेत प्रवेश घेतला. अभ्यासापेक्षा खेळात मन रमत होते कब्बडीचे सामने पाहण्यासाठी मैदानावर वारंवार जात असत. हनुमान सेवा मंडळ,सन्मित्र क्रिडा मंडळ ह्या सामन्याचे आयोजन करीत असत,तेव्हा श्रोते म्हणून सामन्यात जात होते आणि तेव्हापासून कब्बडीने मनात घर केले . मैदानावर जावून खेळ खेळणे या साठी गणेश यांना मदत झाली सखाराम चव्हाण यांची ते गणेश यांना मैदानावर घेऊन गेले. आणि प्रवास सुरू झाला एका राष्ट्रीय खेळाडूचा .पुढे दररोज कब्बडीचा सराव करण्यासाठी हनुमान सेवा मंडळात गणेश जायला लागले. जो काही मैदानावर सराव करीत तो चाळीत आल्यावर मित्राना बरोबर घेऊन करीत. दररोज संध्याकाळी वडील अभ्यासाला घेऊन बसायचे,अभ्यास व खेळ असा नित्यक्रम बनला होता.
कब्बडीचा पहिला सामना हनुमान सेवा मंडळाच्या वतीने गणेश यांनी खेळला तेव्हा ते इयत्ता पाचवीत शिकत होते. त्याच वेळी त्यांची ठाणे जिल्हा किशोर गटासाठी निवड करण्यात आली. पुढे सतत तिन वर्षे चमदार कामगिरी करत गणेश आपल्या अष्टपैलू खेळा ने सर्वांना मोहून टाकत होते. ह्या तीन वर्षात महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात खेळ करत होते. ह्यात घरातील सदस्याचा पाठिंबा होताच. खेळा मुळे आनंद , ऊर्जा, ऊत्साह, मिळत होता लहान पणा पासून गणेश हे प्रसिद्धीच्या झोतात राहिले.
खेळ आणि अभ्यास याचा योग्य ताळमेळ रहावे यासाठी एक वेळापत्रक बनवण्यात आले होते आणि त्या वेळापत्रकाचे गणेश हे काटेकोरपणे पालन करत असत. हेच यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे .
शाळेत मराठी, इतिहास, भूगोल हे विषय अधिक प्रमाणात आवडत होते तर शाळेत कदम सर,कुलकर्णी सर , दांडेकर सर यांचे मार्गदर्शन गणेश यांना लाभले प्रत्येक शिक्षक आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होते. शाळेला राज्यस्तरीय शालेय कब्बडी चषक या स्पर्धेत शाळेला द्वितीय स्थानावर नेले.
शाळेय शिक्षणानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गणेश हे उल्हासनगर येथे R.K.T. महाविद्यालयात गेले असता तेथे प्रवेश नाकारला कारण होते ते कोळशेवाडीत राहायचे. नंतर कल्याण येथे बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेले असता जो प्रकार घडला तो अकल्पित होतो. " अरे गण्या .... मी तुझी वाट बघतोय ये बस इथे "अस बोलत होते ते बिर्ला महाविद्यालयातील खेळ प्रशिक्षक प्रशांत दुमडे सर . सरांनी प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली तो पर्यंत गणेश यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला 'हे ! सर मला कसे ओळयतात ?' ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एक कब्बडीचा सामना ......
जय भारत कळवा येथील सामन्यात N.R.C संघ विरूद्ध हनुमान सेवा मंडळ असा सामना रंगाला होता ,N.R.C हा संघ पाच गुणांनी आघाडीवर होता , गणेश हे बाद होवून बाहेर बसलेले होते, नरेश कदम यांनी एक गुण मिळवला आणि गणेश आत आले आणि बघता बघता पुढिल पाच मिनिटात नऊ गुण घेऊन हनुमान सेवा मंडळ जिंकले कोच म्हणून सर सामना पाहत होते म्हणून गण्या हा विषेश लक्षात राहिला. हाच गणेश आता महाविद्यालयाच्या संघात खेळणार ह्या जाणिवेने ते अंत्यांतीक आनंदी झाले. महाविद्यालयाच्या वतीने खेळत असताना प्रथम वर्षा पासूनच चांगली कामगिरी करण्यात आली परंतु संघाला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. परंतु पुढिल वर्षी संघाने उत्तम कामगिरी करत राज्यस्तरीय अंतिम फेरी गाठली आणि महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक नेले.
गणेश हे कुमार गटात खेळू लागल्यावर पहिल्याच वर्षी हनुमान सेवा मंडळाने जिल्हा स्तरावरील स्पर्धेत अंतिम फेरीत गाठली व अटीतटीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि त्याच वर्षी राज्यातील संघात गणेश यांची निवड करण्यात आली. अठराव्या वर्षी सेंट्रल रेल्वे च्या राष्ट्रिय संघात निवड झाली, आणि तेथेच नोकरीत सुद्धा रूजू झाले. रेल्वेत
खेळत असताना संपूर्ण भारतात दौरे करीत असत महिन्यात दोन दौरे नक्की असत . या दरम्यान अनेक चषक त्यांनी आपल्या संघाला मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला या सर्व प्रवासात यशाचे गमक हे खेळ , व्यायाम, आहार,आराम हीच चतृसुत्री. तसेच वेळापत्रकाचे विषेश महत्त्व होते, वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन गणेश सदैव करीत होते. कल्याण पूर्व मधिल अनेक खेळाडूचा प्रभाव यांच्या वर होता .आज गणेश जगताप यशस्वी आहेत ते कै . अनिल कर्पे, रमेश देवाडीकर, व सुरेश चव्हाण यांच्या मुळे.
100 % खेळात लक्ष , कबड्डी शिवाय डोक्यात काहीही नाही, यासाठी घेतलेली मेहनत, उदाहरणार्थ जाॅगिंग साठी सकाळी 4.30 ला सुरुवात करत होते जाॅगिंग चा मार्ग पुढील प्रमाणे असायचा. गणपती मंदिर ------- > विठ्ठलवाडी -------> श्रीराम टाॅकिज -----> काटेमानिवली नाका --------> चक्किनाका --------> काटेमानिवली नाका ----> हनुमानवाडी . 1000 ते 2000 दोरी उड्या असा व्यायाम सातत्यपूर्ण करीत असत .यात मार्गदर्शकाची भुमिका महत्त्वाची होती, मार्गदर्शक म्हणून कै. गणेश पोळ, कै .सुरेश काळे , आंनद दिघे लाभले. कुटुंबातील सदस्याचे योगदान पण मोठेच होते. वडीलान कडून इमानदारीने काम कसे करावे याचे धडे भेटले तर आई कडून सर्वावर प्रेम करणे .बहिणीकडून नेहमी आनंद मिळाला, सर्वांना बरोबर घेऊन कसे चालावे हे बहिणीने शिकवले. 5 जानेवारी 2005 रोजी गणेश यांनी त्यांच्या रेखा नावाच्या मैत्रीणी बरोबर प्रेम विवाह केला. पुढिल सार्वजनिक कार्यात रेखा ह्या गणेश यांच्या मागे ठामपणे उभ्या असतात. मुलगा आर्यन यांच्या अभ्यासाची जबाबदारी आई कडे असते.
हनुमानवाडी कला,क्रीडा, व सामाजिक संस्था मार्फत राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धचे आयोजिन करण्यात आले ,प्रेम शुक्ला यांच्या साह्याने व राणाप्रताप तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाल्या.
ही स्पर्धा पुर्ण झाली. प्रथमच 12 फ्रेबुवारी 2015 ला कोळशेवाडीत व्यावसायिक साखळी सामने आयोजित केले गेले , या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सामना ठरलेल्या वेळेतच सुरू झाला,आणि नंतर प्रमुख पाहुणे आल्यावर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण राज्यात क्रीडाप्रेमी कडून कौतुक करण्यात आले. तसेच संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतात.या संस्थे मार्फत गणेश जगतात आपले सामाजिक कार्य करीत आहेत.
रेल्वेत 18 वर्षा पासुन कार्यकरीत असतांना गणेश यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वची छाप पाडली सुरवातीच्या काळात टिकिट तपासणी करत असतांना लोकांना खर वाटत नव्हते, प्रवासी तपासणी साठी नकार देत होते, हे पुढे 2 -3 वर्ष चालल. कांतीलाल वरडिकर, संजय कराळे,कुठेकर आणि इतर सहकारी यांची फार मदत होत होती. नंतर 5 वर्षानंतर गणेश यांची विशेष पथकात नियुक्ती झाली .तिथे जसपाल राठोड, सुधीर कामत यांचे मार्गदर्शन लाभले.
गणेश हे आता कबड्डी पटूना मार्गदर्शन करत आहेत. प्रशिक्षक म्हणून नविन खेळाडूंना आपल्या ज्ञानाचा फायदा करून देत आहेत.
वाचकांसाठी संदेश ::--
आयुष्यात खूप मेहनत करा, इमानदारीचे फळ मिळतेच, काम करून प्रसिद्ध व्हा प्रसिद्धी साठी काम नका करू.
कोळशेवाडीसाठी संदेश ::-----
कोळशेवाडीत जन्माला आलो भाग्यच !! कोळशेवाडी कोणत्याही संकटाच्या वेळी एक होते. कोळशेवाडीचा अभिमान आहे.